रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा; मंत्री सामंतांचं कौतुक करताना भरतशेठ गोगावलेंचं विधान!
रत्नागिरी येथील मुख्य बसस्थानकाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना....शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आशावाद व्यक्त केला.या वेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचं विशेष कौतुक करत म्हटलं...माणूस कसा असावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे उदय सामंत. ते महाराष्ट्राला लाभलेलं एक विकासरत्न आहेत. मागच्या वेळी आमच्या रायगडचे पालकमंत्री होते. आता ते मला रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत. पाहूया, आज ना उद्या काहीतरी होईल, असं भरत गोगावले यावेळी म्हणाले.