Please enable javascript.गिरणा नदीच्या पुलावरून उड्या मारून टवाळखोर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी

Nashik News : गिरणा नदीच्या पुलावरून उड्या मारून टवाळखोर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी

Edited by: आशिष मोरेAuthored by: रईस शेख|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Nashik News : मालेगावमध्ये काही तरुण जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत आहेत. गिरणा नदीवरील बंधाऱ्याच्या सांडव्यावर ही मुले उड्या मारत आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतेक मुले अल्पवयीन आहेत. याआधीही अशा स्टंटबाजीमध्ये काही तरुणांचा मृत्यू झाला आहे. तरीही, हे तरुण धोकादायक कृत्य करत आहेत.



  • सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

    सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

    सततच्या पावसामुळे मालेगावच्या गिरणा नदीपात्राच्या सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. अशावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून अल्पवयीन मुलं निसर्गाला आव्हान देत आहेत.

  • जीव धोक्यात घालून स्टंटबाजी

    जीव धोक्यात घालून स्टंटबाजी

    मालेगावमध्ये काही तरुण जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत आहेत. गिरणा नदीवरील बंधाऱ्याच्या सांडव्यावर ही मुले उड्या मारत आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतेक मुले अल्पवयीन आहेत.

  • याआधीही काही तरुणांचा मृत्यू

    याआधीही काही तरुणांचा मृत्यू

    याआधीही अशा स्टंटबाजीमध्ये काही तरुणांचा मृत्यू झाला आहे. तरीही, हे तरुण धोकादायक कृत्य करत आहेत.

  • पोलिसांनी हाकलून लावले, पण...

    पोलिसांनी हाकलून लावले, पण...

    पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्टंटबाजी करणाऱ्या मुलांना तेथून हाकलून लावले. मात्र, पोलीस निघून जाताच, ही मुले पुन्हा स्टंटबाजी करायला लागतात.

  • जीवघेणी कसरत

    जीवघेणी कसरत

    "ही मुले केवळ भिंतीवरून पाण्यात उड्या मारत नाही, तर पाणी अडवण्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेट आणि भिंतीतील गॅपमधून दुसऱ्या बाजूला जीवघेणी कसरत करतात," असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

  • मुलांना थांबवण्याची गरज

    मुलांना थांबवण्याची गरज

    या मुलांनी आधीच्या घटनांपासून बोध घ्यायला हवा होता. कारण, अशा धोकादायक स्टंटबाजीमुळे जीवही जाऊ शकतो. पोलिसांनी या भागात सतत गस्त घालून या मुलांना थांबवण्याची गरज आहे.

  • मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक

    मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक

    याआधीही अशा स्टंटबाजीमध्ये काही तरुणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून ते असे धोकादायक कृत्य करणार नाहीत.