मुंबईने २० ओव्हरमध्ये २०३-६ धावा केल्या होत्या. पंजाबच्या गोलंदाजांचेही कौतुक करायला हवे. कारण शेवटच्या काही ओव्हरमध्ये महत्त्वाच्या विकेट घेत मोठ्या धावसंख्येपासून त्यांना रोखलं. या आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवातीपासून पंजाबने मुंबईवर दबाव टाकला होता. श्रेयस अय्यरने संयमी खेळी करत मुंबईच्या एक पाऊल पुढे ठेवले.
या सामन्यात तसं पाहायला गेलं तर मुंबईनेही अनेक संधी गमावल्या. ज्यामध्ये मुंबई कमबॅक करू शकत होती. कारण लहान लहान संधींचा लाभ न घेतल्याने सामना पूर्णपणे मुंबईच्या हातातून गेला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्दिकनेही एक चूक केली.
पंजाबच्या दोन विकेट पडल्या होत्या. त्यावेळी मैदानात जोस इंग्लिस आणि श्रेयस अय्यर खेळत होते, इंग्लिस याने मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला होता. मुंबईचा हुकमी एक्का असलेल्या बुमराहलाही त्याने सोडलं नाही.
जसप्रीत बुमराहच्या एका ओव्हरमध्ये त्याने आक्रमकपणे खेळत २० धावा वसूल केल्या होत्या. बुमराहला टी-२० क्रिकेट प्रकारामध्ये एका ओव्हरमध्ये २० धावा करणारा तो आठवा खेळाडू ठरला आहे.
दोघांची जोडी जमल्याने मैदानात मुंबईवर दबाव होता. मात्र हार्किद पंड्याने आठव्या ओव्हरमध्ये आपल्या बाऊन्सरवर इंग्लिसला बाद करत धोकादायक जोडी फोडली. आठव्या ओव्हरनंतर मुंबईला थेट आठ ओव्हरनंतर विकेट मिळाली.
एकीकडे श्रेयस आपल्या संघासाठी पुढाकार घेऊन लढत होता. मैदानावर तो अगदी तळ ठोकूनच होता. पण दुसरीकडे पंड्या तसं करताना दिसला नाही.
हार्दिक पंड्याने आपल्या २ ओव्हरमध्ये ९.५० च्या सरासरीने १९ धावा देत एक विकेट घेतली. मात्र मिडल ओव्हरमध्ये त्याने गोलंदाजी केली नाही. मिडल ओव्हरमध्ये टॉपली याच्याकडे वेगवान गोलंदाजीची कमान सोपवली होती. मात्र त्यालाही काही खास यश मिळाले नाही, उलट ३ ओव्हरमध्ये ४० धावा दिल्या ज्यामुळे शेवटला धावाचा जास्त काही दबाव राहिला नाही.
हार्दिक पंड्याने अश्विनी कुमारकडे चेंडू दिला, तेव्हाही तो ओव्हर टाकू शकत होता. कारण हार्दिकने वर्ल्ड कपमध्येही दबावाच्या वातावरणात दमदार गोलंदाजी केली होती. मात्र काल त्याने फक्त दोन ओव्हर टाकल्या. जर पंड्याने काल आपल्या ओव्हर मिडल ऑर्डरमध्ये टाकल्या असत्या आणि काही विकेट घेण्यात यश आलं असतं तर नक्कीच पलटणने हा सामना जिंकत फायनलमध्ये आपला जागा पक्की केली असती.