आयपीएलची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या Qualifier 2 सामन्यात मुंबईच्या संघाने दिमाखात एंट्री केली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ फॉर्मात असल्यावर त्यांचा नाद करु नये, असं म्हणतात. गुजरातचा सामना जिंकत आता ते फॉर्मात आले आहेत.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या सामन्यात जोरदार ठस्सन पाहायला मिळाली. शुभमन गिलने प्रथम हार्दिकचा अपमान केला. त्यानंतर हार्दिकने आपल्या अपमानाचा बदला घेतला होता.
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पाचव्यांदा Qualifier सामन्यात दाखल झाला आहे.
गुजरातसमोर मुंबईने २२८ धावा केल्या होत्या, पण त्याही कमी पडतात की काय, असे वाटत होते. त्यामुळे या सामन्यात मुंबईच्या संघाने जो दडपणाखील विजय साकारला, हे सर्वात महत्वाचे ठरले. याचा फायदा त्यांना पुढच्या सामन्यांत नक्कीच होईल.
मुंबई इंडियन्सचा संघ यापूर्वी चारवेळा क्वालिफायर २ हा सामना खेळला आहे. यापैकी चार सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे. त्यामुळे यशाची टक्केवारी ही ५० टक्के आहे. पण त्यानंतरची गोष्ट सर्वात खास आहे.
मुंबईने आतापर्यंत दोनवेळा क्वालिफायर २ सामना जिंकला आहे. पण जेव्हा मुंबईने हा सामना जिंकला तेव्हा तेव्हा त्यांनी आयपीएलचे जेतेपदही पटकावले आहे.
पंजाबचा संघ गेल्या सामन्यात फक्त १०१ धावाच करू शकला होता. त्यामुळे मुंबईने जर अचूक मारा केला तर ते पंजाबला कमी धावांत गुंडाळू शकतात.
रोहित शर्मा हा भन्नाट फॉर्मात आला आहे. त्यामुळे आता रोहित शर्माकडून या महत्वाच्या सामन्यात सर्वांच्याच मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ प्रथमच क्वालिफायर २ सामन्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या करो या मरो सामन्यात त्याचे नेतृत्व पणाला लागणार आहे.