आयपीएलमधील ६९ वा सामना सवाई मानसिंग स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यामध्ये मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हाय व्होल्टेज सामन्यात पंजाबचा खेळाडू युवा खेळाडू जड गेला.
२३ वर्षाच्या पोराने जगातील दिग्गज गोलंदाजांच्या यादीत येणाऱ्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनाही त्याने विकेट मिळू दिली नाही.
पठ्ठ्याने सुरूवातीपासूनच मैदानात आपला मुक्काम ठोकला होता. मुंबईसारखा तगडा संघ समोर असताना तो घाबरला नाही ना त्याचा आत्मविश्वास खालावला नाही.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून प्रियांश आर्य असून त्याने ३५ चेंडूत ६२ धावांची आक्रमक खेळी करत विजयाचा खऱ्या अर्थाने पाया रचला.
मुंबईने दिलेल्या १८५ धावांचा पाठलाग करतानामम. कारण त्याने आपली विकेट न गमावता खेळपट्टीवर टिकून राहिला.
मुंबईकडून दुसऱ्या विकेटसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांना काही यश आले नाही. दुसरी विकेट मिळेपर्यंत उशिर झाला होता.
यंदाच्या सीझनमध्ये प्रियांशने दमदार फलंदाजी केली आहे. १४ सामन्यात त्याने ४२४ धावा केल्या आहेत. तर यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे तर दोन अर्धशतके त्याने केली आहेत.
विशेष म्हणजे आयपीएलचा प्रियांशचा डेब्यू सीझन असून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याला लवकरच टीम इंडियाची दारेघ उघडली जाऊ शकतात.