टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराटच्या निवृत्तीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
विराट कोहलीच्या चार दिवसांआधी म्हणजेच ७ मे ला कॅप्टन रोहित शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली होती.
टीम इंडियाचा आता इंग्लंड दौरा असून त्या दौऱ्यानंतर विराटने निवृत्ती घ्यावी अशी विनंती बीसीसीआयने त्याला केली होती. मात्र विराटने निर्णय घेतला असून आता रोहित आणि विराटशिवाय टीम इंडिया मैदनात उतरणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती जाहीर केल्यावर आयसीसी रँकिंगमध्ये कितव्या स्थानी होते जाणून घ्या.
रोहित शर्माने निवृत्ती घेतली तेव्हा तो आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये ४१ व्या स्थानावर होता. तर विराट कोहली हा २६ व्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्माने ६७ सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्यात. यामध्ये त्याने १२ शतके आणि १८ अर्धशतके केली आहेत.
विराट कोहलीने १२३ कसोटी सामन्यात ६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली आहेत.
भारतीय कसोटी क्रिकेटला विदेशात आक्रमक रूप देण्यात विराट कोहलीचा मोठा वाटा राहिला आहे. कोहलीने आपल्या कॅप्टन्सीच्या काळात हे सिद्धही करून दाखवल आहे.