आज १९ फेब्रुवारी, आजचा दिवस आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणून सेलिब्रेट करतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना असंख्य अडचणींना तोंड दिलं. कधी मुघलांशी दोन हात केले तर कधी स्थानिक संस्थानिकांशी लढाई केली. पण लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी कधीच हार मानली नाही. किंबहूना संकटांवर पाय देऊन ते उभे राहिले. आपल्याही आयुष्यात अनेकदा प्रतिकूल परिस्थिती येते. चारी बाजूनं संकटं वेढतात. काही केल्या यश मिळत नाही. मात्र अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांचे हे सात विचार वाचा. तुम्हाला पुन्हा एकदा नव्या जोमानं संकटांविरोधात लढण्याची प्रेरणा मिळेल. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
(फोटो सौजन्य - golden_history_of_swarajya/Instagram)